Sunday, 28 March 2021

ठाणे जिल्हा सहकारी बँकेची निवडनुक रंगतदार ठरनार;पडवळ यांना प्रकाश वरकुटेंचे कडवे अव्हान


प्रकाश वरकुटे विरुध्द इंद्रजीत पडवळ लढत चुरशीची ठरनार

विचारमंथन न्युज/प्रशांत गडगे

दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या होऊ घातलेल्या संचालक पदाच्या निवडणुकीत शहापुरातुन प्रकाश वरकुटे निवडणुक रिंगणात उतरले आहेत. महाविकास  परिवर्तन फँनल मधुन  प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थेच्या राखीव मतदार संघातुन वरकुटे ही निवडणुक लढवत असुन एक टर्म संचालक राहिलेले इंद्रजित पडवळ यांन समोर त्यांनी कडवे आव्हान उभे केले आहे.
       दि ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकच्या आगामी संचालक मंडळाची निवडणुक प्रक्रिया सुरु आहे. 21 जागांसाठी ही निवडणुक होत असुन येत्या 30 मार्च रोजी मतदान होणार आहे. शहापुरात सेवा व विविध कार्यकारी संस्थांमधुन 68 मतदार असुन या निवडणुकीत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांच्या मतदार संघातुन प्रकाश नारायण वरकुटे हे पहिल्यांदाच निवडणुक रिंगणात उतरले आहेत. शेणवे विविध कार्यकारी सहकारी संस्थेतुन मतदार प्रतिनिधि म्हणुन ठराव झालेल्या प्रकाश वरकुटे यांनी गेल्या काही दिवसात मतदारांशी संपर्क साधत आपलेच पारडे जड असल्याचे वातावरण निर्माण केले आहे. वरकुटे यांच्या उमेदवारीमुळे माजी संचालक इंद्रजित उर्फ कैलास पडवळ यांचे अस्तित्व पणाला लागले असून त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे राहिल्याचे चिञ तालुक्यातील राजकीय वर्तुळात पहावयास मिळते आहे.  दरम्यान प्रकाश वरकुटे यांच्या उमेदवारीला माजी संचालक इंद्रजित पडवळ यांनी छाणनी वेळी जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांकडे हरकत घेतली होती. फम निवडनुक आधिकारी यांनी प्रकाश वरकुटे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवल्याने पडवळ यांची डोकेदुखी आणखीनच वाढली होती. शिवाय जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे सर्वात जास्त जाळे असलेल्या शहापूर तालुक्यात या दोघांमध्ये काटे की टक्कर पहावयास मिळणार असून अवघ्या जिल्ह्याचे लक्ष्य   या लढती कडे लागले आहे. प्रकाश वरकुटे यांना विजयाची खात्री आसुन उद्या होनार्या मतदान प्रक्रीयेत मतदार आपले बहुमुल्य मत कोणाच्या पारड्यात टाकतात हे पाहने औच्युक्याचे ठरनार आहे.

Friday, 26 March 2021

शहापुर वनपरीक्षेत्रात वणवा भडकला; वन विभागाचे दुर्लक्ष


अवैध्य वृक्षतोड ही जोमात

वनसंरक्षणात जनजागृतीचा अभाव;

प्रशांत गडगे / शहापुर

मागील काही दिवसापासुन शहापुर वनपरीक्षेत्रातील आटगांव साखरोली माहुली, सावरोली, चांदरोटी,चेरपोली परीसरात मोठ्या प्रमाणावर वणवे लागत आहे. या वणव्यांन मुळे वन संपदा नष्ट होत आसुन मुक्याप्राण्यांना ही अगीची झळ सोसावी लागत आहेत. हे वणवे लावले जातात की आपोआप लागतात याचा शोध घेणे गरजेचे आसुन शहापुर वणपरीक्षेत्रातील अधिकारी याबात कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्यामुळे वणवे लागण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे.

वन विभागाच्या जागृतीअभावी वणवा लागत असल्याने पर्यावरण वेठीस धरण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.त्यावर संबंधित विभागाने सखोल प्रबोधन व मार्गदर्शन करण्याची नितांत गरज असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यावेळी खासगी क्षेत्रातील वणवा लावणाऱ्यावर कारवाई करावी,प्रसंगी जी.पी.आर.एस  प्रणालीचा वापर करून गुन्हेगारास शिक्षा करावी हा उपायही होऊ शकतो.दरवर्षी वणवा लागण्याच्या घटनेत वाढच होताना दिसत आहे. ही अतिशय दुदैर्वी बाब असून, यावर उपाय शोधून पर्याय निवडावा व पर्यावरणाचे होणारे नुकसान टाळावे, अशी काहीशी अपेक्षा स्थानिक नागरिकांमधूनही करण्यात येत आहे.वनसंरक्षणात जनजागृतिच्या अभावाने व अधिकाऱ्यांच्या हलगर्जिपणामुळे या विभागात वणवा लागत असल्याचा ठपका वन अधिकाऱ्यांवर ठेवण्यात आला आहे.तसेच सुस्त पडलेल्या वन विभागाने वणव्यांचा विषय गांभिर्याने घ्यावा आशी मागणी होत आहे. 


#कारवाई अभावी धाडस वाढले#

वनविभाग हा वणवा लागलेला भूखंड किंवा परिसर, खासगी मालकीचा आहे हे कारण पुढे करत दोषींवर कारवाई करण्यासाठी चालढकल करताना दिसत आहे.वन विभागाच्या जनजागृतीच्या अभावाने डोंगर रांगातील शेतकरी,आदिवासी स्वत:च्या शेतीच्या बांधाला वणवा लावून नामानिराळ राहतो.वनविभाग वणवा लागलेली जागा खासगी असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे या ठिकाणी वणवा लावणाऱ्यांचे धाडस वाढत आहे.

#डोंगर भकास झाले#

शहापुर वनपरीक्षेत्रात माहुली डोंगर ताणसा अभयअरांण्यामधे येतो तर आटगांव साखरोली, आवाळे, सावरोली, चेरपोली ते पिवळी पर्यंत मध्ये वनविभागाच्या मालकीचे, काही खाजगी मालकीचे डोंगर भकास झाले आसुन वन विभागासाठी ही शर्मेची बाब आहे.


नेहमीच अश्या प्रकारचे वणवे लागत असल्याने वनविभागाच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. जागा कोणाची आहे, हे न पाहता वणवा लावणाऱ्यावर कायदेशीर कडक कारवाई करा,अशी मागणीही वन्यप्रेमींनी वनविभागाकडे केली आहे. तालुक्यातील सर्व डोंगररांगा जळून उजाड झाल्यानंतर संबंधित विभागाला जाग येणार असेल तर ही अतिशय गंभीर बाब असून, त्वरित संबंधित दोषींवर कारवाई व्हावी,अशी मागणीही इतर स्तरांतूनही करण्यात येत.

##वनकर्मचारी मुख्यालयी वास्तव्य करत नाहीत##

शहापुर रेंज कार्यालय अंतर्गत असणारे बहुतांशी कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने वणवा लावणारांचे मोठ्या प्रमाणात धाडस होत असते.तरी सबंधीत दोषी आधिकार्यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरन प्रेमी संघटना करीत आहेत.

##शेतकरी,पशुपालक यांचा तीव्र संताप##

या ठिकाणी लागलेल्या वणव्यात शेकडो एकर गवताळ प्रदेश जळून खाक झाल्याने शेतीसाठी लागणारे गवत तसेच म्हैस,गाय पाळणारे दुग्धव्यावसायिकांमध्ये वणवा लावणाऱ्याविरुद्ध तीव्र संताप निर्माण झाला आहे.तसेच वनविभाग अज्ञातविरुद्ध कोणत्याही प्रकारची कारवाई करत नसल्याने त्यांविरुद्धही मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झाला आहे.

Friday, 19 March 2021

ठाणे जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प सादर: पहा काय आहे या अर्थ संकल्पात


ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०२०-२१चा सुधारित आणि २०२१-२२ चा मूळ अर्थ संकल्प सर्वसाधारण सभेपुढे सादर

 २०२१-२२ चा मूळ अर्थ संकल्प ८५ कोटी ५० लाख ४६ हजार ५००

 उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ समिती सुभाष पवार यांनी सादर केला अर्थसंकल्प

ठाणे दि. १९ मार्च २०२१ :

 ठाणे जिल्हा परिषदेचा सन २०२०-२१ चा सुधारित आणि सन २०२१-२२ चा ८५ कोटी ५० लाख ४६ हजार ५०० रुपयांचा मूळ अर्थसंकल्प आज झालेल्या जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत उपाध्यक्ष तथा सभापती अर्थ समिती सुभाष पवार यांनी सादर केला. 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे,  आरोग्य व बांधकाम समिती सभापती 
कुंदन पाटील, कृषि, पशुसंवर्धन व  दुग्धशाळा समिती सभापती संजय निमसे , समाजकल्याण समिती सभापती नंदा उघडा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रुपाली सातपुते, मुख्य लेखा व वित्तधिकारी सुभाष भोर, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन) अजिंक्य पवार , तसेच सर्व सन्मानीय सदस्य, पंचायत समिती सभापती व सर्व जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी उपस्थित होते. 

करोनाकाळात शासनाने निर्गमित केलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. विकास विषयक योजना प्रभावीपणे व परिणामकारक राबविण्यासाठी पुरेसे आर्थिक पाठबळ असणे आवश्यक असते. जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प हा मुख्यत: राज्य शासनाकडून प्राप्त होणाऱ्या अनुदानावर अवलंबून असतो. माहे मार्च 2020 ते आजतागायत जगभर तसेच भारतात व राज्यात सर्वत्र कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या कोव्हिड-19 या संसंर्गजन्य आजाराच्या साथ रोगामुळे राज्यशासनाचे उत्पन्न कमालीचे घटले असल्याने पर्यायाने जिल्हा परिषदेचे उत्पन्नात प्रचंड प्रमाणात घट झालेली आहे. तरी देखील सर्व बाबींचा विचार करता सन 2020-21च्या  मूळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत सुधारीत अंदाजपत्रकामध्ये महसूली जमा कमी असली तरी आरंभीच्या शिलकेसह सुधारीत अंदाजपत्रकामध्ये जमेच्या रकमेमध्ये 7.25 टक्क्यांनी वाढ झालेली आहे.

सन 2020-21 च्या मूळ अर्थसंकल्पात आरंभीच्या शिलकेसह महसूली जमा रक्कम रु.124,59,98,815/-(एकशे चोविस कोटी एकोणसाठ लाख अठ्ठ्याण्णव हजार आठशे पंधरा मात्र.) इतकी होती. महसूली खर्चाचा मूळ अर्थसंकल्प रक्कम रु.124,59,52,600/-(एकशे चोविस कोटी एकोणसाठ लाख बावन्न हजार सहाशे) एवढया रकमेचा होता. तसेच सन 2021-22 च्या मूळ अर्थसंकल्पात आरंभिच्या शिलकेसह महसूली अपेक्षित जमा रक्कम रु.85,50,94,315/- (पंच्याऐशी कोटी पन्नास लाख चौऱ्याण्णव हजार तिनशे पंधरा मात्र.) एवढी धरण्यात आली असून रक्कम रु.85,50,46,500/- (पंचाऐंशी कोटी पन्नास लाख सेहेचाळीस हजार पाचशे मात्र.) एवढा खर्च अपेक्षित धरण्यात आलेला आहे. सन 2021-22 चे मूळ अथंसंकल्पात मागील तीन वर्षात प्राप्त झालेल्या उत्पन्नाची सरासरी, जमीन महसूल अनुदान, बिगर शेती कर, पाणीपटटी उपकर इ. बाबींचा प्रामुख्याने विचार करुन अपेक्षित जमा दर्शविण्यात आलेली आहे. या  अर्थसंकल्पामध्ये सर्व पंचायत समित्यांच्या उपकर जमा खर्चाचा समावेश  करण्यात आला आहे.

 पाणीपुरवठा योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी भरीव तरतूद

नविन पाणीपुरवठा योजनांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होतो.  तथापी, देखभाल दुरूस्तीसाठी अत्यल्प प्रमाणात निधी उपलब्ध होतो हे विचारात घेऊन देखभाल दुरूस्तीसाठी जिल्हा परिषद अर्थसंकल्पात स्वतंत्ररीत्या भरीव तरतूद करण्यात आली आहे. जेणेकरून नादुरूस्त किंवा बंद योजना चालू करून ग्रामिण भागात सुरळीत पाणी पुरवठा उपलब्ध होईल.

जि.प.चा सन  2020-21 चा सुधारित व सन 2021-22 चा मूळ अर्थसंकल्प तयार करतांना म.जि.प. व पं.स. अधिनियमातील तरतूदी  व ग्राम विकास विभाग व जलसंधारण विभागाने निर्गमित केलेले शासन निर्णय, अधिसूचनांप्रमाणे जिल्हा परिषद उत्पन्नाच्या ठराविक बाबींच्या 20 % रक्कम पाणी पुरवठा, 20% रक्कम समाज कल्याण, व 10% रक्कम महिला व बालकल्याण विभागासाठी  ठेवण्यात आलेली आहे.  

मागील अनुशेषापोटी सन 2020-21 च्या सुधारीत अंदाजपत्रकामध्ये समाजकल्याण विभागासाठी रक्कम रु.3,62,09,298/- (तीन कोटी बासष्ट लाख नऊ हजार दोनशे अठ्ठ्याण्णव मात्र) व महिला व बाल कल्याण विभागास रक्कम रु. 2,55,40,640/- (दोन कोटी पंचावन्न लाख चाळीस हजार सहाशे चाळीस मात्र) इतकी रक्कम देण्यात आलेली आहे.

 दिव्यांगांसाठी 5% निधी
राखीव

दिव्यांगांसाठी 5% निधी राखीव ठेवण्याबाबत शासनाच्या सुचना असल्यामुळे तशी तरतूद करण्यात आली आहे. सदर निधी समाजकल्याण विभागाच्या अधिनस्त असून त्यांनी प्रस्तावित केलेल्या योजनांसाठी निधी वितरण करण्यात आले आहे. याचा फायदा ग्रामिण भागातील दिव्यांग व्यक्तींच्या उन्नतीसाठी होईल. शासन निर्णय दि.18/6/2010 मधील तरतूदीनुसार ई-गव्हर्नन्स योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी ठेवण्यात आला आहे.  ई-गव्हर्नन्सच्या माध्यमातून सन 2021-22 या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदे अंतर्गत जमा व खर्चाची सर्वसमावेशक माहिती मिळण्याकामी संगणक प्रणाली राबविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

 जिल्ह्याच्या विकासाकरीता ठळक नवीन योजना समाविष्ट करण्यात आलेल्या आहेत.

 शिक्षण विभाग 
• पर्यवेक्षण व सनियंत्रणासाठी सॉफ्टवेअर निर्मिती.
• जिल्हा परिषद शाळांमधील विद्युत जोडणी व देयक अदा करणे ( छोट्या ग्रामपंचायतीमधील शाळांकरिता अनुदान देणे)  
• शिक्षण खात्यातील मालमत्तेचे तसेच अभिलेख सर्वेक्षण/संरक्षण व संवर्धन करणे.

 आरोग्य
• महाआरोग्य शिबिर आयोजित करणे.

 ग्रामपंचायत
• ग्रामपंचायत सदस्य प्रशिक्षण कार्यक्रम.

 कृषि

कृषि विभागातर्गत आपत्कालीन परिस्थितीत उपाय योजना करणे.

सन 2021-22 च्या मूळ अर्थसंकल्पात जिल्हा परिषदेच्या निरनिराळया विभागांकडील सामूहिक व वैयक्तिक लाभाच्या कल्याणकारी योजना प्रामुख्याने घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. केला आहे.  ठाणे जिल्हा परिषद ही सामान्य जनांचे हित जोपासणारी जिल्हा परिषद असून, जिल्हा परिषदेचा प्रत्येक सभापती, सदस्य, प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा जिल्हा परिषदेसाठी झटत आहे. ही जिल्हा परिषद जास्तीत जास्त लोकाभिमुख कशी होईल तसेच माझ्या तळागाळातील बांधवांना योजनांचा लाभ मिळवून देण्याचा जाणिवपूर्वक प्रयत्न केला असल्याचे श्री.पवार यांनी अर्थसंकल्पीय भाषणात स्पष्ट केले.

Tuesday, 9 March 2021

आसनगांव औद्योगिक वसाहतीत अग्नितांडव#कारखाना जळुन खाक




प्रशांत गडगे 

शहापुर तालुक्यातील आसनगांव औद्योगिक वसाहतीत क्रिश्ना प्रमोशन या कारखान्यात पाहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणात आग लागुन संपुर्ण कारखानाच जळुन खाक झाला आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हनी झाली नसली तरी कारखाना मालकाचे करोडो रुपयांची वित्त हानी झाली आहे.
        याबाबत सविस्तर वृत्त आसे की शहापुर तालुक्यातील आसनगांव औद्योगिक वसाहतीतील वेहळोली रस्त्यालगत आसलेल्या क्रिश्ना प्रमोशन  या प्लाँस्टिक ची विविध उपकरणे बनवनार्या कारखान्याला पाहाटेच्या  च्या सुमाराला मोठी आग लागली. या विविध प्लँस्टिकच्या वस्तूचा साठा व उत्पादन करनारा हा कारखाना होता. त्यामुळे मंगळवारी पाहाटे लागलेल्या आगीमध्ये प्लास्टीक वस्तूंनी तात्काळ पेट घेतला आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले होते. यामुळे ही आग संपूर्ण कारखान्यात पसरली होती.
आगीची माहिती मिळताच कल्याण, भिवंडी, ठाणे येथील अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. दरम्यान, आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी  आग्निशामक दलाच्या जवानांचे दुपार पर्यत प्रयत्न सुरु आहेत. या आगीची तिव्रता येवढी प्रचंड होती की आसनगांव व वासिंद पर्यत धुराचे मोठे लोट पसरले होते. या आगीत करोडो रुपयांच्या प्लास्टिकच्या वस्तू जळून खाक झाल्या आहेत.सदर घटने मुळे  शहापुर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापनेचे तिन तेरा वाजले आसुन सदर कारखान्याला आग लागल्या पासुन दिड तास उलटल्यानंतर ही प्रशासना कडुन कोणीतीही मदत उपलब्ध झाली नसल्याने आग वाढत गेली. या वेळी स्थानिकांनी आग आटोक्यात आणन्याचे प्रयत्न केले परंतु त्यांना अपयश आले.अगीचे कारण अजुन स्पष्ट झाले नसले तरी ही आग लागली की लावली गेली या बाबत नागरीक शंका घेत आहेत.शहापुर तालुक्यातील झपाट्याने होनारे नागरीकरण,औद्योगिक वसाहती पाहता शहापुर तालुक्यात आग्निशामक दल आसने गरजेचे आहे.पण जनतेच्या या मागणी कडे शासनाने आजही दुर्लक्ष केले आहे.

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...