Tuesday, 20 December 2016

समृध्दीचा सर्वात मोठा वाटा शेतकर्यांना मिळनार

समृद्धीचा सर्वात मोठा वाटा शेतकऱ्यांना मिळणार  - देवेंद्र फडणवीस 

कुणबी समाजाचे प्रश्न नक्कीच सोडवणार 

# 20 वर्षे महाराष्ट्राला पुढे नेणारा समृद्धी  महामार्ग  

आसनगांव प्रतिनिधी/ प्रशांत गडगे

      नव्याने होऊ घातलेल्या मुंबई - नाशिक महामार्गामध्ये प्रथमच जमिनी जाणारा शेतकरी समृद्ध होणार असून यामध्ये शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्या शिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे सुतवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहापूर येथे केले . पुढे त्यांनी   200 कोटी रुपये भावोली पाणी योजनेसाठी उपलब्ध करून देणार असून नव्याने होणाऱ्या धरणांसाठी जमिनी घेतल्या तर तेथील जनतेला सर्वप्रथम पाणी देणे बंधनकारक ठरण्याचा कायदा करणार असल्याचे सांगितले .  ओबीसी समाजाचे वेगळे मंत्रालय , स्वतंत्र मंत्री लवकरच  उपलब्ध करून देणार असल्याचे सांगत  ,  शामराव पेजे महामंडळला या मार्चच्या बजेटपूर्वी 50 कोटींचा निधी उपलब्ध करण्याची घोषणा केली .  छत्रपतींच्या स्मारकाला झालेले उशीर याचे दुःख आहे , परंतु जगातील सर्वात उंच स्मारक होत असल्याचा आनंद आहे .  तालुक्यातील आसनगाव येथील जोंधळे मैदानात मागील  तीन दिवसांपासून सुरु असलेल्या कोकण स्तरीय कुणबी स्नेहसंमेलनाच्या समारोपप्रसंगी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज शहापुरात आले होते . यावेळी त्यांच्या बरोबरच राज्याचे कृषिमंत्री पांडुरंग फूडकर , खा कपिल पाटील , आ पांडुरंग बरोरा , आ किसन कथोरे , आ नरेंद्र पवार , माजी आ दौलत दरोडा , कुणबी सेना प्रमुख विश्वानथ पाटील  उपस्थित होते . 

               यावेळी मुरबाडचे आ कथोरे यांनी आपल्या भाषणात पाहिल्यानंदीच कुणबी समाज एकत्र आल्याचे कौतुक करीत कुणबी जनतेचे आभार मानले . निवडणुकीपुरता कुणबी मतदारांची। गरज लागते याचा उल्लेख करीत विकासाच्या नावाने मत मागतो , मी कुणबी म्हणून मतदान मागीत नाही .  बिगर आदिवासी समाजाच्या हक्काच्या सरकारी नोकऱ्या काढल्याचा निषेध करीत त्या परत मिळवण्यासाठी प्रयत्न करायची विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली . ओबीसी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय देण्याची मागणी केली . 75 साली वन कायदा आला आणि हक्काच्या जमिनी गेल्या . समृद्धी महामार्ग  जुन्या महामार्गावरून घेण्याची विनंती या वेळी केली . पर्यटन तालुके म्हणून शहापूर व मुरबाड घोषीत केले तर रोजगार उपलब्ध होण्यास  मदत होईल .  

संघर्ष समितीच्या सदस्यांना शांत राहण्यासाठी  आ कथोरेंची मध्यस्थी !

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार असल्याचे समजताच तालुक्यामध्ये अफवांचे वादळ दोन दिवसांपासून सुरु झाले होते . यामध्ये मुख्यमंत्र्यांच्या येण्याच्या मार्गावर काळे झेंडे दाखवावे , मोहत्सवाला मार्गदर्शन करताना निषेधाच्या घोषणा देण्याच्या शक्यता अशा अफवा , मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गात बाधीत होणाऱ्या परिसरात सुरु होत्या . यावर आधीच उपायोजना करण्यासाठी मुरबाड मतदारसंघाचे भाजप पक्षाचे आमदार किसन कथोरे यांनी पुढाकार घेत शहापूर शासकीय विश्रमगृहात संघर्ष समिती बरोबर बैठक घेत शेतकऱ्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत मी स्वतः या प्रश्नात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याचे तोंडी  आश्वासन दिले .

पत्रकारांची गैरसोई

अनेक वर्षानंतर महाराष्ट्रचे मुख्यमंत्री  शहापुर नगरीत येनार म्हणुन व तसेच सध्याचे शहापुर तालुक्यातील दोन मुख्य ज्वलंत विषय समृध्दी माहामार्ग व बिगर आदिवासी नोकरभरती बाबत मुख्यमंत्री काय भुमिका घेतात या सदर्भात आनेक पत्रकारांना उत्सुकता होती परंतु आयोजकांनी दिलेल्या विस पत्रकारांच्या यादीत आनेक पत्रकारांची नावे नसल्यामुळे  अनेक पत्रकारांचा पुरता हिरमोड झाला.


No comments:

Post a Comment

लसिकरणाचा शहापुर पॅटर्न; आज होनार 25 आरोग्य उपकेंद्रावर लसिकरण

  शहापुर /प्रशांत गडगे शहापुर तालुक्यात करोना च्या दुसर्या लाटेचा प्रादुर्भाव सध्या अटोक्यात येत आसुन सध्या मितीस रुग्ण संख्या घटत असल्यामुळ...